इंद्रायणी भाताचं अहिल्यानगरमधलं नवं केंद्र कुठे आहे?
इंद्रायणी भाताचं अहिल्यानगरमधलं नवं केंद्र कुठे आहे?
Published
अहिल्यानगर जिल्ह्यातला अकोलेच्या घाटमाथ्याचा प्रदेशात पाडाळणे गाव आहे. इथला परिसर पर्यटनासाठीही प्रसिद्ध आहे. पावसाचं प्रमाण जास्त त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांचा भात हे पीक घेण्याकडेच मुख्य कल असतो. पण पारंपरिक भातशेतीला नाकारत पाडाळणे गावातील शेतकऱ्यांनी दहा वर्षांपूर्वी बाजारात मागणी असणाऱ्या इंद्रायणी भाताची निवड केली. आणि त्याचं भरघोस उत्पन्न त्यांना मिळू लागलं. आज पाडळणे गाव इंद्रायणी तांदळाचा हब म्हणून ओळखलं जातं. पण तज्ज्ञ सांगता- मोनोक्रॉप म्हणजे एकपीक पद्धत जमिनीला मारक ठरू शकते. त्याविषयीचा हा बीबीसी मराठी प्रतिनिधी श्रीकांत बंगाळे यांचा रिपोर्ट.
शूट- किरण साकळे
व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर






