भारतीय आरोग्य व्यवस्थेवरचं संकट नेमकं काय? डॉ. अभय, डॉ. राणी बंग यांची सडेतोड मुलाखत

भारतीय आरोग्य व्यवस्थेवरचं संकट नेमकं काय? डॉ. अभय, डॉ. राणी बंग यांची सडेतोड मुलाखत
Published

भारतीय आरोग्य व्यवस्थेवरचं संकट नेमकं काय? या विषयावर बीबीसी मराठीचे संपादक अभिजीत कांबळे यांनी डॉ. अभय, डॉ. राणी बंग यांची घेतलेली खास मुलाखत.

डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग गेल्या 40 वर्षांपासून गडचिरोलीत करत असलेल्या आरोग्याच्या कामाबद्दल आणि भारतातील बदलत्या आरोग्य व्यवस्थेबद्दल बोलतात.

कुपोषण, बालमृत्यू, मधुमेह, हृदयरोग, मानसिक आरोग्य, महिलांचे आरोग्य आणि दारू-तंबाखूचं व्यसन यांसारख्या अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर ते आपले अनुभव आणि मतं मांडतात.

वाढता उपचार खर्च, डॉक्टर आणि रुग्णांमधलं बदललेलं नातं आणि आरोग्यसेवेचं वाढतं व्यापारीकरण यावरही ते बोलतात.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)